जायचे होते तुला तर थांबुनी वळलीस का?
उंबरा ओलांडताना नेमकी अडलीस का?
वार तू करता विखारी, शब्दही भांभावले
माझिया प्रश्नांवरी मग मौन तू बसलीस का?
तू निरोपाला हसोनी मानले मजला खूळे
पाठमोरी होउनी मग आसवे टिपलीस का?
एकदा तू सांग माझ्या पाहुनी डोळ्यांमधे
एवढे मी बोलता तू लोचने मिटलीस का?
घेतले माझ्या वसंताला जरी तू सोबती
पानगळ शिशिरातली झाल्यापरी झडलीस का?
जगदिश
Sunday, June 7, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment